Home » महाराष्ट्रातील किल्ले

महाराष्ट्रातील किल्ले

‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’
या शब्दांत सह्याद्रीच्या डोंगर-दर्‍यात वसलेल्या महाराष्ट्राचे यथार्थ वर्णन गोविंदाग्रजांनी केलेले आहे.
महाराष्ट्राला सह्याद्रीच्या रांगांमध्ये घनदाट जंगलांची निसर्गसंपत्ती लाभलेली आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास ह्या दर्‍या-खोर्‍यांशी, डोंगरांशी जोडलेला आहे. या डोंगर रांगांतील किल्ले हा इतिहास आपणासमोर आजही बोलका करतात. या किल्ल्यांवरच इतिहास जन्माला आला आणि यांच्या साहाय्याने स्वराज्य स्थापन झाले. हे किल्ले इतिहासाची साक्ष तर देताताच तसेच गिर्यारोहण व पर्यटन यादृष्टीनेही हे किल्ले महत्त्वपूर्ण आहेत.

पारगड किल्ला (Pargad Fort)

पारगड किल्ला

किल्ल्याची ऊंची : 2420किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्गडोंगररांग: कोल्हापूरजिल्हा : कोल्हापूरश्रेणी : मध्यमपारगड हा महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवर वसलेला नितांत सुंदर किल्ला आहे. गडाचे क्षेत्रफळ अंदाजे ४८ चौरस एकर आहे. गडाला पूर्व, पश्चिम व उत्तरेला नैसर्गिक ताशीव कडयाची तटबंदी आहे. दक्षिणेला थोडया उतारा नंतर खोल दरी आहे. सन १६७६ मध्ये पोर्तुगीजावरील स्वारीवरुन परत येताना शिवरायांनी हया डोंगराचे भौगोलिक स्थान व महत्व ...

Read More »

तोरणा किल्ला – Torna Fort

तोरणा किल्ला - Torna Fort

किल्ल्याची ऊंची: 1400 किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही जिल्हा: पुणे श्रेणी: मध्यम शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले, त्यापैकी एक किल्ला तोरणा. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव “तोरणा” पडले. महाराजांनी गडाची पाहाणी करतांना याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे ‘प्रचंडगड’ असे नाव ठेवले. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून असलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले ...

Read More »

दौलतमंगळ – Daulatmangal Fort

दौलतमंगळ (Daulatmangal) किल्ल्याची ऊंची : 2000 किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : पुणे श्रेणी : सोपी पुणे – सोलापुर मार्गावरील यवत गावा जवळ असणारा दौलतमंगळ किल्ला आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सध्याच्या काळात दौलतमंगळ किल्ला म्हणुन फ़ारसा प्रसिध्द नाही. पण त्या टेकडीवर असलेल हेमाडपंथी भुलेश्वर मंदिर मात्र प्रसिध्द आहे. १२ व्या शतकात बांधलेल्या भुलेश्वर मंदिराचा बांधकाम काळ्या बेसाल्ट खडकात केलेले ...

Read More »

रायगड

किल्ल्याची ऊंची : 2900 किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रायगड जिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम महाडच्या उत्तरेस २५ कि.मी. वर असलेला रायगड किल्ला हा चहुबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला आहे. याच्या उत्तरेला आणि पूर्वेला काळ नदीचे खोरे पसरलेले आहे, तर पश्चिमेला गांधारी नदी वाहाते. याच्या पूर्वेला लिंगाणा, आग्नेयेला राजगड, तोरणा; दक्षिणेकडे मकरंदगड, प्रतापगड, वासोटा, उत्तरेला कोकणदिवा असा मुलूख दिसतो. रायगडाचा माथा ...

Read More »

राजगड किल्ला – गडांचा राजा आणि राजांचा गड

Rajgad Fort - राजगड किल्ला

किल्ले राजगड (Rajgad Fort) किल्ल्याची उंची: १३९४ मीटर किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग श्रेणी : मध्यम जिल्हा : पुणे हिंदवी स्वराज्याची राजधानी! गडांच्या राजाच्या बैठकीचा गरुडी कडा! सुवेळा माचीचा शेपटा पेलून, पद्मावती आणि संजीवनी माचीचे पंख पसरून उडत्या पवित्र्यात खडा असलेला अस्मानी पक्षी! गणपती, पद्मावती, मारुती, काळेश्वरी, जान्हवी, ब्रम्हदेव या देवदेवतांच्या राउळांची शिखरे स्वर्गाच्या पायरीला भिडवणारी बारामावळातील उच्चासनी पंढरी! शिलेखाना, कलमखाना, ...

Read More »

शिवरायांचे दुर्गविज्ञान आणि दुर्गव्यवस्थापन

P. K. Ghanekar - प्र. के. घाणेकर

गड-कोट-किल्ले आणि दुर्ग ही आहेत संघर्षाची प्रतीके! शस्त्र सज्ज दुर्गेचे तिथे अधिष्ठान असते. ह्या दुर्गम-बुलंद-बेलाग नि बळकट जागा म्हणजे जणू स्वातंत्रलक्ष्मीचं यज्ञकुंडच! तोफांचे धडधडाट आणि तलवारींचे खणखणाट यांचेच सूर तिथे कानी पडत. रणवाद्यांच्या जल्लोषातच दुर्गांची वास्तुशांत होते. किल्ल्यांच्या सारीपटावर मुत्सद्देगिरीचे फासे तिथे खुळखूळवले जात असत. पराक्रमाची शर्थ करणाऱ्या मानवी सोंगट्या हलवूनच विजयी ठरण्याची महत्वकांक्षा तेथे धरली जात असे. अशा किल्ल्यांमध्ये ...

Read More »

दुर्गबांधणीचे शास्त्र

श्री. प्र. के. घाणेकर - P. K. Ghanekar

छत्रपती शिवरायांच्या काळात प्रत्येक दुर्ग मध्यवर्ती सत्तेच्या पूर्णपणे नियंत्रणात असे. कुठल्याही देशमुख – देशपांडे, सरदार – सेनापतीला गढी बांधायला सक्त मनाई होती. प्रत्येक गडावर सरकारी सैन्य असे. त्यावर प्रमुख ३ अधिकारी असत. सबनिस ब्राह्मण जातीचा असे. त्याच्याकडे आयव्ययाची व उपस्थितीची नोंद असे. कारखानीस हा कायस्थप्रभू असे व त्याच्याकड़े रसदीचा विभाग असे. तर किल्लेदार मराठा असे व त्याच्याकडे सेना विषयक अधिकार ...

Read More »

गिरिदुर्गांचे आठ प्रकार

राजगड बालेकिल्ला - Rajgad Fort

तंजावरच्या सरस्वती महल ग्रंथालयात अपूर्ण अवस्थेत असणाऱ्या आकाशभैरवकल्प पोथी मध्ये पटल क्रमांक २१ ते २७ मध्ये अष्टविध गिरीदुर्गांची माहिती दिली आहे. डॉ. गोडे यांनी या ग्रंथा बाबत तपशीलवार माहिती प्रसिध्द केली आहे. सुई सारख्या निमुळत्या आकाराचा, माणसाच्या आकाराचा, सुपाच्या आकाराचा, मध्ये तुटलेला, वाकडा तिकड़ा, नांगरा सारखा असे किल्ले राजाला राहण्यास योग्य नाहित असे नमूद केलेले आहे. याच ग्रंथात भद्र, अतिभाद्र, ...

Read More »

चला माहिती घेऊया गडकोटांविषयी

रायगड - महाद्वार

गिरी-दुर्गांच्या पहाऱ्यातून महाराष्ट्रात गडकोट वैभव विपुल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग असे सांगत साल्हेर अहिवंतापासून जिंजी तंजावरपर्यंत दुर्गाची एक प्रचंड शृंखला उभारून स्वराज्य सुरक्षित करून ठेवले. दुर्गमता हा गडाचा गाभा होता, शत्रूकडे असलेल्या हत्याराच्या ताकदीवर दुर्गाची रचना अवलंबून असे.प्राचीन काळी वस्तीभोवती काटेरी झाडे टाकून वस्तीचे रक्षण करण्यात येई. नंतर लाकडाचे परकोट उभारण्यात येऊ लागले.मग दगडाची रचाई ...

Read More »

आज्ञापत्रांतील दुर्ग प्रकरण

गडकोटांचे महत्व

संपूर्ण राज्याचें सार तें दुर्ग. दुर्ग नसतां मोकळा देश परचक्र येतांच निराश्रय, प्रजाभग्न होऊन देश उद्वस होतो. देश उद्वस झाल्यावरी राज्य असें कोणास म्हणावें ? याकरीतां पूर्वी जे जे राजे झाले त्यांनी आधी देशामध्यें दुर्ग बांधून तो तो देश शाश्वत करून घेतला, आणि आलें परचक्रसंकट दुर्गाश्रयी परिहार केले. हें राज्य तर तिर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडांवरूनच निर्माण केले. जो जो ...

Read More »