Standard 5th and 8th school scholarship exam sample answer sheet for mark scoring Download PDF blank answer sheet for print
Read More »युगप्रवर्तक छत्रपती शिवराय
ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं, त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. सुमारे ३०० वर्षे महाराष्ट्र पारतंत्र्यात, गुलामगिरीत खितपत पडला होता. दिल्लीचे मुघल, आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह यांच्या अत्याचाराने इथली गरीब जनता भरडली जात होती. साम्राज्यवादाने झपाटलेल्या सुलतानी आक्रमणांमुळे इथली घरे-दारे, पिक-पाणी, बायका-पोरी सुरक्षित नव्हत्या. याच काळात शहाजीराजे भोसले व ...
Read More »अफझल खान वध
सभासदाने खानवधाचा प्रसंग प्रत्यक्ष पाहिला असावा एवढ्या बारकाईने तो या प्रसंगाचे चित्रण करतो. एवढेच नाही तर हे सर्व चित्रण कमालीचे प्रत्ययकारी झाले आहे. राजे भेटीस निघाले दुसरे दिवशी गडाखाली राजियानी सदर केली. डेरे, बिछाने व असमानगीर्या, तवाशिया व मोतियाच्या झालरी लाविल्या. चित्रविचित्र बडे व लोडे, गाद्या पदगाद्या टाकिल्या. सदर सिद्ध केली. घाटमाथा लष्करसुध्धा नेताजी पालकर आणविले होते. त्यासी इशारत सांगोन ...
Read More »रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे
थोरले बाजीराव पेशवे (१८ ऑगस्ट १७०० – २८ एप्रिल १७४०) हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे इ.स. १७२० पासून पेशवे होते. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावांनेही ओळखले जातात. रणधुरंधर पहिल्या बाजीरावांनी आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा नर्मदेपलीकडे हिंदुस्तानभर विस्तारल्या. पेशवे बालाजी विश्वनाथ भट यांचा बाजीराव हा मोठा मुलगा तर चिमाजी ...
Read More »छत्रपती संभाजी महाराजांचे बालपण
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर १४ मे १६५७ साली झाला (जेष्ठ शु. १२ शके १५७९). बालपणी दोन वर्षाचे असताना आई सईबाई यांचे निधन झाले. राजामाता राष्ट्रमाता जिजाऊ यांनी त्यांचा सांभाळ केला. कापूरहोळ येथील धाराउ गाडे या मातेचे दूध देवून संभाजी राजांचे पोषण केले. कऱ्हाकाठावरील पुरंदर हा प्राचीन व ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध किल्ला आहे. येथील सह्याद्रि डोंगर रांगेवरील हिरवीगार औषधी वनस्पती ...
Read More »दक्षिण दिग्विजय मोहीम
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चातुर्याच्या, युद्धाच्या, पराक्रमाच्या आणि मुत्सद्देगिरीच्या अनेक प्रेरणादायी ऐतिहासिक घटना आपल्याला माहित आहेतच. महाराजांनी आणि त्यांच्या शूर सरदारांनी-मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ करून स्वराज्य उभे केले. रक्ताचे पाणी करून स्वराज्याची वीट अन वीट शाबूत ठेवायचा अविरत पराक्रम केला. स्वराज्यावर चालून येणारे संकट शिताफीने हाताळून, त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जायचा. त्याच शिवकालातील काही न उलगडलेल्या घटनांचा अभ्यास आजही सुरु आहेच. ...
Read More »छत्रपती शाहू महाराज
१८ मे १६८२ रोजी उत्तर कोकणात रायगड किल्ल्याच्या जवळच गांगवली, माणगाव येथे छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई यांच्या पोटी शाहू राजांचा जन्म झाला, जन्मनाव ठेवले होते ‘शिवाजी’. औरंगजेबाचा सरदार जुल्फिकारखान याने रायगड काबीज करून बालशिवाजी व त्यांच्या कुटुंबास कैद केले. येसूबाई, सकवारबाई आणि इतर स्त्री-पुरुष सेवक बालशिवाजीसोबत कैद झाले होते. पुढे औरंगजेबाने बालशिवाजीना राजा म्हणून मान्यता आणि ७ हजारांची मनसबही ...
Read More »मराठे – निजाम संबंध
दक्षिण हिंदुस्थानच्या इतिहासातील अठराव्या शतकातील मराठे – निजाम संबंध आणि संघर्ष ही अत्यंत महत्त्वाची बाब होती. हैदराबादच्या निजाम घराण्याचा संस्थापक निजामुल्मुल्क हा गाजीउद्दीन हाताखाली तयार झालेला एक युद्धकुशल सेनापती होता. त्याला मोगल दरबारातून फतेहजंग खानदौरान, चिनकिलीच खान, निजाम-उल्मुल्क आसफजाह अशी विविध बिरूदे मिळाली होती. औरंगजेब बादशाहच्या मृत्यूनंतर मोगली सत्तेच्या कमकुवतपणाचा फायदा उठवून निजाम-उल्-मुल्क इ.स. १७२४ मध्ये दक्षिणेत आपली स्वतंत्र सत्ता ...
Read More »छत्रपति शिवरायांची बलस्थाने – कोशबल
प्राचीन राजनीतीपर ग्रंथांमध्ये बलाचे ३ प्रकार सांगितले आहेत. मंत्रशक्ती, उत्साहशक्ती आणि प्रभुशक्ती. मंत्रशक्ती म्हणजे राजा आणि त्याचे प्रधानमंडळ यांचे राजनैतिक नैपुण्य आणि परिस्थिति – काळानुरूप निर्णय घेण्याची शक्ती. उत्साहशक्ती म्हणजे राजा, प्रधानमंडळ आणि त्यांचे सैन्य हे किती पराक्रमी आहेत, त्यांच्या अंगीभूत शौर्य किती आहे, ह्यावर अवलंबून असलेली शक्ती. तर प्रभुशक्ती म्हणजे राजाची आणि राज्याची कोश (खजिना) आणि सैन्य (लश्कर) यांची ...
Read More »छत्रपती राजर्षी शाहू महाराज
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यातील जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव होते. चौथ्या शिवाजीं राजांच्या अकाली निधनानंतर ते १७ मार्च १८८४ रोजी कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले. राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले, सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे गुरू त्यांना मिळाले. विद्यार्थीदशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास, ...
Read More »