Home » मराठा साम्राज्य

मराठा साम्राज्य

मराठा साम्राज्य इ.स. १६७४ ते इ.स. १८१८ पर्यंत भारतात अस्तित्त्वात असलेले हिंदू राज्य होते. याच्या परमोच्च बिंदूला या साम्राज्याने दक्षिण आशियाचा मोठा भूभाग व्यापला होता. हे साम्राज्य शिवाजी महाराजांनी इ.स. १६४५ मध्ये विजापूर राज्यातून पुण्याजवळील तोरणा किल्ला जिंकून स्थापन केले. शिवाजींनी त्यांच्या कालावधीत औरंगजेबाविरूद्ध गनिमी कावा वापरून केलेल्या लढायांमुळे मराठी साम्राज्याचा विस्तार प्रचंड वाढला. इ.स. १६८०मधील शिवाजींच्या मृत्यूनंतर काही काळ अस्थैर्य माजले जे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर संपले. यानंतर शिवाजींचे वंशज जरी राज्य करत असले तरी प्रधानमंत्री असलेल्या पेशव्यांच्या हातात राज्यकारभाराची सूत्रे गेली. पेशवे हे प्रभावी राज्यकर्ते होते आणि त्यांच्या कारकिर्दीत मराठी साम्राज्य अधिक विस्तार पावले शेवटी पानिपतच्या तिसर्‍या लढाईत अफगाण सैन्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. अखेरचा पेशवा दुसरा बाजीराव आंग्लांबरोबरील तिसर्‍या लढाईत पराभूत झाला.

मराठा लाईट इन्फन्ट्री स्थापना दिवस

maratha light infantry day

स्वातंत्र्यानंतर सुद्धा प्रत्येक युद्धवेळी मराठ्यांनी रणमैदान गाजवून सोडलं होतं. आजही ती उज्ज्वल परंपरा चालू आहे. म्हणूनच मराठा सैनिकांचा केवळ भारतातच नव्हे तर जगभर दरारा अन आदर आहे. भारतातील सर्व समाजाला आणि मराठा लाईट इंफंट्री मधील सर्व शूर सैनिकांना "मराठा डे" च्या हार्दिक शुभेच्छा

Read More »

मराठ्यांचे सैन्य संघटन – पायदळ

मराठा पायदळ सैनिक - Maratha Soldier

पायदळ हा सुद्धा घोडदळाप्रमाणे मराठ्यांच्या सैन्याचा महत्वपूर्ण भाग होता. मराठा सैन्यात पायदळाला दुय्यम स्थान प्राप्त झाले होते. पायदळाची गतिशीलता घोडदळापेक्षा निश्चित कमी होती परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी पायदळाकडे तेवढेच बारीक लक्ष्य दिले. महाराष्ट्रातील पर्वतमय भागात पायदळ जास्त उपयोगी पडत असे, तसेच किल्ल्यांच्या वा लष्करी ठाण्यांच्या रक्षणासाठी हजारो पायदळ सैनिकांची गरज भासत असे. युद्धात संख्येने सर्वात जास्त असणारे पायदळ हातघाईच्या लढाईत ...

Read More »

मराठा घोडदळ

मराठा घोडदळ - Maratha Cavalry

|| सरनौबतस्तु सेनानी: || अशी समर्पक व्याख्या देत राज्यव्यवहारकोशात सरनौबताचे वर्णन आले आहे. सरनौबत ही शिवकालातील अत्यंत मोठी आसामी. घोडदळ आणि पायदळ या दोन्ही सैन्याप्रकारावर शिवकालात स्वतंत्र प्रमुखांची नियुक्ती होत असे. दोन्ही विभागांचा कारभार हा स्वतंत्रपणे अमलात येत आणि मग हे दोन्ही सरनौबत एकत्रितपणे येऊन मोहिमेची आखणी, खर्च, मांडणी आणि इतर मनसुबे रचत. हिशेब ताळेबंद आणि खर्च पत्रे यांच्या आधारे ...

Read More »

मराठे – निजाम संबंध

अहमदनगर भुईकोटाचे शाईत चितारलेले रेखाचित्र (इ.स. १८८५) - Ahmednagar fort interior

दक्षिण हिंदुस्थानच्या इतिहासातील अठराव्या शतकातील मराठे – निजाम संबंध आणि संघर्ष ही अत्यंत महत्त्वाची बाब होती. हैदराबादच्या निजाम घराण्याचा संस्थापक निजामुल्मुल्क हा गाजीउद्दीन हाताखाली तयार झालेला एक युद्धकुशल सेनापती होता. त्याला मोगल दरबारातून फतेहजंग खानदौरान, चिनकिलीच खान, निजाम-उल्‍मुल्क आसफजाह अशी विविध बिरूदे मिळाली होती. औरंगजेब बादशाहच्या मृत्यूनंतर मोगली सत्तेच्या कमकुवतपणाचा फायदा उठवून निजाम-उल्‍-मुल्क इ.स. १७२४ मध्ये दक्षिणेत आपली स्वतंत्र सत्ता ...

Read More »

आनंदराव धुळप यांची समाधी, विजयदुर्ग

आनंदराव धुळप यांची समाधी, विजयदुर्ग - Anandrao Dhulap

सुभेदार सुभा आरमार, आनंदराव धुळप यांची समाधी, विजयदुर्ग Anandrao Dhulap. Admiral of Maratha Empire at Vijaydurg.

Read More »

इस्ट इंडियामन व्यापारी जहाज

इस्ट इंडियामन व्यापारी जहाज - East Indiaman Ship

हे आहे एक ‘इस्ट इंडियामन’. अशाच प्रकारच्या व्यापारी जहाजांवर बसून इंग्रज, डच, आणी फ्रेंच भारतात आले. या जहाजात मालासोबत तोफखानाही असे, तसेच एक तुकडी शिबंडीची असे. जेणेकरून, समुद्रावर शत्रूशी गाठ पडल्यास त्याच्याशी मुकाबला केला जाऊ शकतो. एका जिद्दी कॅप्टनच्या हाताखाली एक इंडियामन बऱ्याच भारतीय प्रकारच्या गलबतांना झुंझत ठेऊ शकतो. शिवकाळात, इंडियामन जहाजांना भारताच्या कोणत्याच राज्याने लढाईत जिंकले नाही आणी अशाच ...

Read More »

सरखेल कान्होजी आंग्रे

सरखेल कान्होजी आंग्रे - Sarkhel Kanhoji Angre

कान्होजी आंग्रे यांचा जन्म १६६९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे या गावी झाला. मराठ्यांचा इतिहास घडविणाऱ्या प्रसिद्ध घराण्यांपैकी आंग्रे घराणे हे एक. पुणे जिल्ह्यातील काळोसे हे आंग्रे घराण्याचे मूळ गाव व शखपाळ-शंकपाळ-संकपाळ हे त्यांचे मूळ आडनाव; परंतु आंगरवाडी ह्या काळोसेतील एका छोट्या भागावरून त्यांस पुढे आंग्रे हे उपनाव प्राप्त झाले. सेखोजी हे या घराण्यातील पहिले ज्ञात पुरुष. त्यांचे चिरंजीव तुकोजी हे ...

Read More »

सैन्याची संरचना

मराठा सैन्य

या युद्धपद्धतीमध्ये शिवछत्रपतींनी महाराष्ट्राच्या भौगोलिक स्थितीचे विशेषत: किल्ल्यांचे महत्त्व ओळखून अनेक नवीन किल्ले बांधले व जुन्यांची डागडुजी केली; तसेच प्रत्येक किल्ल्यावर हवालदार नेमून त्याच्या हाताखाली एक सरनोबत, एक सबनीस, एक फडणीस आणि एक कारखानीस असे भिन्न जातींचे अधिकारी नेमले. याशिवाय किल्ल्याच्या अगदी लगतच्या परिसरात बंदोबस्तासाठी रामोशी, परवारी, महार, मांग, बेरड वगैरे मेटकरी नेमलेले असत. प्रत्येक किल्ल्यावर दारूखाना, अंबारखाना व पाण्याची ...

Read More »

मराठा साम्राज्य विस्तार

Maratha Samrajya मराठा साम्राज्य

महाराष्ट्रीय उर्फ मराठी साम्राज्य महाराष्ट्राबाहेर महाराष्ट्रीयांचा अम्मल जेथे जेथं होता त्या सर्व प्रदेशाला मिळून महाराष्ट्रीय किंवा मराठी साम्राज्य म्हणतात. तथापि या सर्व प्रदेशावर सातारच्या राजाची अनियंत्रित सत्ता (अकबर, औरंगझेबाप्रमाणें) नव्हती आणि त्याचें मुख्य प्रधान जे पुण्यास रहाणारे पेशवे यांच्या हातीं जरी राज्यकारभाराची मुख्य व्यवस्था होती, तरी साम्राज्यांतील निरनिराळया भागांत मराठयांनी वसाहती स्थापून कोल्हापूरकर व नागपुरकर भोंसले, शिंदे, होळकर, गायकवाड, वगैरे ...

Read More »

शिवकालीन अष्टप्रधानमंडळ

राजा शिवछत्रपती राज्याभिषेक अष्टप्रधानमंडळ

शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला. शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना अतिशय व्यापक व प्रभावी होती. या कल्पनेमुळे निर्वीकार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली, या समारंभ प्रसंगी शिवाजींनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती हेच स्वराज्याचे सार्वभौम व सर्वसत्ताधारी होते; त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते राज्याच्या सर्व क्षेत्रात त्याची निरंकुश सत्ता चालत ...

Read More »