महाडच्या उत्तरेस २५ कि.मी. वर असलेला रायगड किल्ला हा चहुबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला आहे. याच्या उत्तरेला आणि पूर्वेला काळ नदीचे खोरे पसरलेले आहे, तर पश्चिमेला गांधारी नदी वाहाते. याच्या पूर्वेला लिंगाणा, आग्नेयेला राजगड, तोरणा; दक्षिणेकडे मकरंदगड, प्रतापगड, वासोटा, उत्तरेला कोकणदिवा असा मुलूख दिसतो. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व प्रशस्त आहे. शत्रूला अवघड वाटणार्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी ...
Read More »गोनीदांचे दुर्गप्रेमींना पत्र
गडे हो ! अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून या दुर्गदर्शनासाठी या. आपापले उद्योग एक्या अंगास सारून या. दो चौ दिसांची सवड काढून या. पण हे दुर्ग म्हणजे काही लोणावळा, माथेरान किंवा आपल महाबळेश्वर नव्हे. नुसत डोंगर चढणं आहे, रान तुडवण आहे, स्वत:चं अंथरूण पांघरूण पाठीवर वागवीत रानोमाळ हिंडाव लागतं. तिथं असतो भराट वारा, असतं कळा कळा तापणार ऊनं,असतात मोकाट डोंगरदरे, पण हे ...
Read More »महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष
स्वराज्यात साडेतीनशे किल्ले आहेत. त्यातला प्रत्येक किल्ला फक्त एक वर्ष जरी लढला तरी स्वराज्य जिंकण्यासाठी औरंगजेबाला एक हयात पुरणार नाही. – स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. जे किल्ले सोपे व अतिप्रसिद्ध आहेत त्यावर गडप्रेमी जेव्हा इतिहासाच्या व महाराजांच्या प्रेमाखातर जातात तेव्हा त्यांना “बेगड” प्रेमी लोकांनी करून ठेवलेले उत्पात बघायला मिळतात, या हरामखोर मंडळींनी कोरलेले घाणेरडी रंगरंगोटी पहिली तर कडेलोट किंवा ...
Read More »